Skip to main content

Posts

Showing posts from 2025

बरसन लागी रे...!!

   बरसन लागी रे...!!  मला शास्त्रीय संगीताची खरी आवड १९८० साली लागली असे म्हणता येईल. आणि प्रगतीही झपाट्याने झाली. आमच्या इन्स्टिटयूटमध्ये कल्चरल ट्रॉफीसाठी होणाऱ्या स्पर्धांमध्ये मला वाद्यवादन  स्पर्धेत १९८१, ८२, ८३, ही सलग ३ वर्षे मला प्रथम पारितोषिक होते.  शास्त्रीय संगीत फार काही जाणकारीने नाही, तरी जाणीवपूर्वक ऐकता येऊ लागले. त्यामुळे सुरवातीच्या काळात प्रत्यक्ष ऐकलेल्या उत्तम कलाकारांच्या मैफिलीतील असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, कि आजही ते स्मरणरंजनाचा आनंद देतील. किशोरीताईंचा हुसैनी तोडी व मीरा मल्हार,  संगीत मार्तंड जसराजजींचे गोरख कल्याण व जोग राग (१९९२-IIT), अभिषेकी बुवांचा धीरगंभीर जोगकौन्स ( १९८० ठाणे), भीमसेनजींचा सवाईला गायलेला भारदस्त रामकली (१९८२), वसंतरावांचा 'छेडो ना छेडो' वाला खेळकर बिहाग ( गडकरी, ठाणे), परवीन सुलतानाचा आसदार गुजरी तोडी ( सवाई , १९९२), मालिनीताईंचा मारवा ( ठाणे ), बिरजू महाराज -झाकीर अभूतपूर्व जुगलबंदी ( १९८१- IIT ), उल्हास कशाळकरांचा बसंत बहार ( २००१, ठाणे ) गंगुबाईंचा अवाढव्य पुरिया ...

बटाटे वडा

  बटाटे   वडा                                                                       अ स्सल मराठी रसिक खवय्याला खाताना बेभान करणारे ' बटाटे वडा ' हे खाद्य किती जुनं आहे, ह्याचा तपशील माझ्याकडे नाही. पण माझ्या नाबाद ६४ वर्षांच्या इनिंग मधली निदान ५० वर्षे तरी ह्या खाद्याने मला खाण्यातला कदाचित क्षणिक पण स्वर्गीय आनंद दिलाय. असे म्हणतात कि दादरच्या अशोक वैद्य यांनी १९६६ साली दादर स्टेशनच्या बाहेर पहिला वडा पावचा स्टॉल टाकला होता. खरं म्हणजे हा वडा पाव आणि मिसळ पाव ह्या दोन गोष्टी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरु झाल्या होत्या. पण आमच्यासारख्या पांढरपेशा वर्गाने त्यावरही यथेच्छ ताव मारून त्यांचे भाव वाढवले आणि मूळ उद्देश नाहीसा झाला. १९७०च्या सुमारास आम्ही गिरगांवात असताना आमच्या लहानपणी माझी आई कधीतरी बाहेरून येताना बाहेरून आम्हां सर्वांसाठी बटाटेवडा आणीत असे. (माझी आई तेव्हा क्लासला जाऊ...

पर्व .... एक मंथन !!

  पर्व .... एक मंथन !! " साहित्यकृतीचे मूलद्रव्य मानवी भाव - भावना , आशा - आकांक्षा , सुख - दुःख हेच असतं ; इतिहासाचा तपशील नव्हे " -   एस. एल. भैरप्पा " महाभारत   आपलं आपणच समजून घ्यायचं असतं . त्याचा अन्वयार्थ आपणच लावायचा असतो . त्यासाठी संदर्भग्रंथ नाहीत , तर मनन   आणि चिंतन आवश्यक असते " - ज्येष्ठ विचारवंत कै . दाजीशास्त्री पणशीकर पर्व ह्या महाभारतावरील कादंबरीत नेमके काय असेल , हे भैरप्पांच्या वरील वाक्यातून लक्षांत येतं . मला नेमक्या त्या मूलद्रव्यातच रस आहे. ह्या मूलद्रव्यांचा संयोग घडवून भैरप्पांनी महाभारतावरचे असे काही बेमालूम ‘रसायन’ तयार केले आहे, कि मी अगदी रात्रीचा दिवस करून ही कादंबरी वाचली.  लेखाच्या  शीर्षकात जरी 'मंथन' असा शब्द आला असला, तरी ह्या लेखाची व्याप्ती एव्हढी मोठी निश्चितपणे नाही. मंथन होण्यासाठी विषयाचा प्रचंड अभ्यास लागतो. कदाचित हे फक्त ‘कथानक’ नाही एव्हढाच ह्या शीर्षकाचा अर्थ  आहे . पण ही कादंबरी वाचताना बऱ्याच ठिकाणी मी घुटमळत राहिलो, विशेष करून जिथे जिथे रूढी ...